Ad will apear here
Next
कर्तृत्ववान महाराणी गायत्रीदेवी
महाराणी गायत्रीदेवी (Photo : Wikidata)अत्यंत सुंदर, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि उत्तम कर्तृत्व यांचा मिलाफ महाराणी गायत्रीदेवींच्या व्यक्तिमत्त्वात होता. वेगवेगळ्या प्रकारच्या चारचाकी गाड्या चालवण्यापासून पोलो खेळापर्यंत आणि शिकारीपासून घोडेस्वारीपर्यंत असे त्यांचे वैविध्यपूर्ण छंद होते. संस्थानांच्या विलिनीकरणानंतर महाराणी हे बिरुद मिरवून आरामदायी जगणे शक्य असतानाही त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेऊन लोकसेवा केली. ‘नवरत्ने’ मालिकेत आज ओळख महाराणी गायत्रीदेवींची...
............
अत्यंत देखणी, रुबाबदार, आखीव-रेखीव, तेजःपुंज, विलोभनीय, हरिणाक्षी अशा अगणित उपमांनी जिच्या सौंदर्याचे वर्णन केले गेले, ती जयपूर घराण्याची महाराणी गायत्रीदेवी ही सुंदर तर होतीच, अगदी जगातल्या पहिल्या १० सौंदर्यवतींमध्ये तिचे नाव होते, इतकी सुंदर; पण जोडीला तितकेच प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्वही तिच्याकडे होते.  

गायत्रीदेवी म्हणजे एका राजघराण्यातून दुसऱ्या राजघराण्यात आलेली आणि लाडकी राजकन्या म्हणून वाढलेली आणि नंतर राणी किंवा राजमाता झालेली स्त्री. (जन्म : २३ मे १९१९, लंडन). गायत्रीदेवींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. आपल्या पूर्वायुष्यात त्या उत्तम प्रकारे पोलो खेळत. तसेच त्यांना शिकारीचाही छंद होता. त्या एक ख्यातनाम नेमबाजही होत्या. घोडेस्वारीची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचे ते कौशल्यही वादातीत होते. वेगवेगळ्या पद्धतीच्या चारचाकी गाड्या चालवण्याचीही त्यांना आवड होती. मर्सिडीझ बेंझ कंपनीची गाडी भारतात सगळ्यात पहिल्यांदा त्यांनीच मागवली होती. रोल्स रॉइसच्या गाड्यांची वेगवेगळी मॉडेल्स खरेदी करणे, हीसुद्धा त्यांची एक आवड होती. त्यांचे स्वतःचे असे एक छोटे विमानही होते. (बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड (तृतीय) हे गायत्रीदेवींच्या आईचे वडील.) 

राजमाता किंवा महाराणी हे बिरुद मिरवत उर्वरित आयुष्य आरामदायी घालवणे सहज शक्य असताना, सर्व संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलिनीकरण झाल्यानंतर गायत्रीदेवींनी राजकारणात भाग घेतला. त्यांची ती कारकीर्द अत्यंत यशस्वी ठरली. आपल्या आयुष्यातल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत त्या विक्रमी मतांनी विजयी तर झाल्याच; शिवाय त्याची नोंद ‘गिनीज बुक’मध्येही करण्यात आली. याच ठिकाणाहून त्या त्यांच्या स्वतंत्रता पक्षाच्या तिकिटावर तीन वेळा विजयी झाल्या आणि त्यांनी १५ वर्षं यशस्वी कारभार केला. पुढे त्यांचे पती सवाई मानसिंह (द्वितीय) यांची काँग्रेस सरकारतर्फे स्पेन येथे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी गायत्रीदेवींना काँग्रेस पक्षात येण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून गायात्रीदेवींनी तो प्रस्ताव फेटाळून लावला. १९६७ साली त्या पुन्हा एकदा जनसंघाशी युतीत असलेल्या आपल्या स्वतंत्रता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोऱ्या गेल्या आणि जिंकल्यासुद्धा. आणीबाणीच्या काळात त्यांनी कारावासही भोगला. 

आयुष्याच्या पूर्वार्धात अत्यंत संपन्न आणि आरामाचे आयुष्य व्यतीत केलेल्या गायत्रीदेवींना ‘शांतिनिकेतन’सारख्या पवित्र आणि समृद्ध गुरुकुलात शिक्षण मिळाले. त्याव्यतिरिक्त त्यांनी आधी लंडन, स्वित्झर्लंड आणि पुन्हा लंडन येथे आपले उच्च शिक्षण पूर्ण केले होते. घेतलेल्या शिक्षणाचा, केलेल्या अभ्यासाचा त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत योग्य पद्धतीने उपयोग करून घेतला. पुढे त्यांनी जयपूर येथे मुलींसाठी निवासी शाळाही सुरू केली. 

वयाची पन्नाशी पार केल्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. नंतर त्यांनी त्यांच्या आवडीनिवडी आणि आयुष्यातील धाग्यादोऱ्यांची सांगड घालून काही पुस्तकं लिहिली. ‘ए प्रिन्सेस रिमेंबर्स’ नावाने त्यांचे आत्मचरित्र आहे. तसेच राजघराण्यातील खाद्यपदार्थ आणि त्यांच्या आठवणींबद्दलचे ‘Gourmet's Gateway : A Royal Collection’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले. फ्रँकोइस लेवी या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला ‘Memoirs of Hindu Princess’ हा चित्रपट गायत्रीदेवींच्या आयुष्यावर बेतलेला होता.  

अत्यंत गंभीर आजारावर उपचारांसाठी परदेशी गेलेल्या असताना त्यांनी परत आपल्या गावी, जयपूरला येण्याची इच्छा व्यक्त केली आणि वयाच्या ९०व्या वर्षी (२९ जुलै २००९ रोजी) जयपूर येथे त्यांचे निधन झाले. 

- आरती आवटी
ई-मेल : aratiawati@gmail.com

(‘नवरत्ने’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZRKBT
Similar Posts
लेखणीची शक्ती दाखविणाऱ्या काशीबाई पूर्वी विविध प्रकारच्या बंधनांमुळे केवळ ‘चूल आणि मूल’ यांतच अडकून पडावे लागलेल्या स्त्रियांनी आज आपल्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रौत्सव आजपासून सुरू होतो आहे. ते औचित्य साधून आम्ही घेऊन येत आहोत ‘नवरत्न’ नावाची लेखमालिका. पूर्वीच्या काळी अनेक बंधने
पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे पतिनिधनानंतर ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र बंद पडू न देता ते स्वतः अत्यंत उत्तम पद्धतीनं चालवून तानुबाई बिर्जे यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांचं कर्तृत्व सिद्ध केलं. ‘नवरत्ने’ मालिकेत आज माहिती घेऊ या पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे यांच्याबद्दल...
बहुपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कमलादेवी चट्टोपाध्याय स्वातंत्र्याच्या चळवळीतील सहभाग, पारंपरिक कलांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न, लेखन, सामाजिक कार्य या आणि अशा विविध क्षेत्रांत कार्य केलेलं बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय. ‘नवरत्ने’ मालिकेत आज त्यांच्याबद्दल...
कल्पनातीत कामगिरी करणारी ‘कल्पना’ १६व्या वर्षी ‘दोन रुपये रोज’ उत्पन्नाने सुरुवात करून, चाळिशीत अब्जावधी रुपयांची आणि मुंबई शहरात अनेक प्रकारच्या स्थावर-जंगम मालमत्तेची मालकीण झालेल्या स्त्रीची ही कथा आहे. विश्वास ठेवता न येण्याजोग्या या सत्यकथेची नायिका आहे कल्पना सरोज. ‘नवरत्ने’ मालिकेत आज त्यांच्याबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language